PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

अपयश लपविण्यासाठी ते धर्म आणि रामाच्या नावाचा बिगुल वाजवत आहेत- …


मनोज पांडे हा भाजपचा एजंट आहे

स्वामीप्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल

लखनौ, . सोने की चिडिया संबोधल्या जाणाऱ्या भारताला धर्माच्या ठेकेदारांनी गरीब आणि लाचार केले असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी केली. अपयश लपविण्यासाठी ते धर्म आणि रामाच्या नावाचा बिगुल वाजवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणाही साधला तसेच मनोज पांडेय हे भाजपाचे एजंट असल्याचा दावादेखील त्यांनी केला. या देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करणे, अत्याचार करणे हा आपला हक्क मानणारे, आपल्यासाठी प्राण्यांपेक्षाही वाईट जगण्याची परिस्थिती निर्माण करणारे आपले गुणगान कसे करू शकतात ? असा सवालही त्यांनी केला. रामचरितमानसच्या चौपईचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ढोल, रानटी, शूद्र, पशु स्त्री, घोर शिक्षेचे अधिकारी या आधारावर तुम्ही जर सावध राहिले नाही तर तुनचे शोषण सुरूच राहील.

 

अयोध्येत हजारो वर्षांपासून रामाची पूजा केली जाते. भाजप त्याचे मार्केटिंग करत आहे. तरुण बेरोजगार आहेत, पण त्यांच्या नोकरीचा प्रश्नच नाही. ईडीच्या माध्यमातून सरकार विरोधी नेत्यांना त्रास देत आहे. लोकशाहीप्रधान देशात लोकशाही गिळंकृत करण्याची तयारी सुरू आहे.

 - स्वामीप्रसाद मौर्य, नेते सपा